Nuksan Bharpai : राज्यात झालेल्या खरीप हंगाम 2024 मध्ये (Kharif Season 2024) अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर (Unseasonal rain) नुकसान झालं होतं. अखेर या नुकसानीची भरपाई मंजूर करण्यात आली असून जवळपास ३१७८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता उर्वरित शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
खात्यात पैसे जमा., जिल्हानिहाय संपूर्ण यादी पहा
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर (Nuksan Bharpai) झाली आहे. खरीप २०२४ मध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी जवळपास ३१७८ कोटी रुपये मंजूर झाले असून यापैकी १६२० कोटी रुपये वाटप करण्यात आले असून उर्वरित १५५८ कोटी रुपये वाटप सुरु असल्याचे प्रशासनाने सांगितले.